शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात घरोघरी पाईपने गॅस पुरवठा -जयगडमध्ये एलएनजी टर्मिनलचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:37 IST

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरामध्ये हिरानंदानी गु्रपतर्फे फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनल सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या तीन वर्षांमध्ये जिल्हयातील घराघरांमध्ये

ठळक मुद्देदाभोळ प्रकल्पालाही गॅस पुरवठा होणार

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरामध्ये हिरानंदानी गु्रपतर्फे फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनल सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या तीन वर्षांमध्ये जिल्हयातील घराघरांमध्ये पाईपदवारे स्वयंपाक गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. देशातील केवळ महानगरांमध्येच उपलब्ध असलेली ही सुविधा येथे उपलब्ध झाल्यास रत्नागिरी हा अशी सुविधा मिळविणारा देशातील पहिला जिल्हा ठरू शकेल.

देशातील पहिल्या फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनलचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या प्रकल्पादवारे थेट पाईप लाईनमधून दाभोळच्या रत्नागिरी पॉवर प्रोजेक्टला गॅसचा पुरवठा ३६५ दिवस केला जाणार आहे. गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी पॉवर प्रोजेक्ट वर्षातून केवळ ६ महिनेच कार्यरत आहे. एच एनर्जीच्या टर्मिनलमधून पाईपदवारे गॅसचा पुरवठा झाल्यानंतर दाभोळच्या रत्नागिरी पॉवर प्रोजेक्टमधून वर्षभर विजनिर्मिती शक्य होणार आहे.

टर्मिनल उदघाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जो प्रकल्प उभारण्यासाठी ४ ते ५ वर्षांचा कालावधी लागतो, असा हा प्रकल्प हिरानंदानी ग्रुपने केवळ १७ महिन्यात अत्यंत कल्पकतेने पूर्ण केला आहे. एलएनजी ही देशाची गरज आहे. स्वच्छ इंधनाच्या वापराकडे देशाला नेण्याचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. उद्योग, वाहतूक व घरगुती वापरासाठी जयगडचे हे टर्मिनल जिल्'ासाठी महत्वाचे ठरेल. पाईपलाईनमधून एलएनजी गॅस मिळणार असल्याने रत्नागिरीकर भाग्यवान असून महाराष्ट दिनी देशाला एक नवीन व्यवस्था मिळाली असल्याचे फडणवीस म्हणाले.

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी जयगड बंदर हे कोकण किनाºयाला लाभलेले वरदान असल्याचे सांगितले. कारखान्यांना गॅस इंधन मिळाले तर जयगड भागात व परिसरात कारखान्यांचा विकास वेगाने होईल. या पार्श्वभूमीवर पोर्टबेस इंडस्ट्री सिटी विकसित करायला हवी. कारखानदारीला आवश्यक वातावरण, सुविधा येथे आहेत, असे जेएसडब्ल्यूचे संचालक सज्जन जिंदाल यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर उद्योगपती निरंजन हिरानंदानी, दर्शन हिरानंदानी, खासदार विनायक राऊत, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार उदय सामंत, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.गॅस हे क्लीन फ्युएलरत्नागिरी जिल्हयातील घरोघरी, वाहने व उद्योगांना इंधन म्हणून गॅस पुरवठा करण्यासाठी आवश्यक स्टोेरेज स्टेशन्स कंपनीतर्फे उभारली जाणार आहेत. घरांमध्ये दिला जाणारा हा गॅस एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त मिळणार आहे. तसेच या गॅसच्या वापरामुळे स्वच्छ इंधन (क्लीन फ्युएल) उपलब्ध होणार असून अन्य इंधनाप्रमाणे प्रदुषणाचा धोका उरणार नाही.

 

 

 

 

टॅग्स :ministerमंत्रीgovernment schemeसरकारी योजना